Marathi Kavita

*********************************************************************************

"फुलांमधील सुंदर फुल ........... असा गुलाब तू आहेस,

हिरे मोतीं मधील सर्वात अनमोल ...... असा कोहिनूर तू आहेस,

अनेक चांदण्या शोभा वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत ........... पण सर्वात शोभा वाढविणारा चंद्र तू आहेस,

माझे तर फक्त शरीर आहे ................. धडधडणारे हृदय तू आहेस".............


***********************************************************************************
'' माणसाला सुंदर
दिसण्यासाठी सुंदर असणं
महत्वाचे नसतं.....

तर महत्वाचं असतं ते सुंदर
नि तितकंच निरागस मन...,

आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल
तर जगात

त्या व्यक्तीपेक्षा सुंदर
कोणी दिसूच शकत नाही....!!!''

***********************************************************************************ओठांनी - ओठांशी बोलून तर बघ..
अमृत नाही पाझरले तर सांग मला...

श्वासांनी - श्वासांना झेलून तर बघ...

कस्तुरी नही उधळली तर सांग मला...

डोळ्यांनी - डोळ्यांशी बोलून तर बघ...

प्रेमात नाही पडलीस तर सांग मला...

मनानेच - मनाला स्पर्श करुन बघ..

माझ्यात नाही सामावलीस तर सांग मला.


**********************************************************************************
 प्रेम हे जिवनासाठी आहे.

पण जीवन हे प्रेमासाठी नाही.

प्रेम हे जीवनात असु शकते.

पण जीवन प्रेमात असु शकत नाही.

प्रेमात जीवन वाया घालवु नका.

पण जीवनात प्रेम करायला विसरु नका... 

**********************************************************************************
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,

सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,

सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,

स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन

स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,

तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात.!!!! 

***********************************************************************************
 माणसावर जेवढे प्रेम करावे,
तेवढी ती दूर जातात ,

फुलांना जास्त कवटाळल्यावर,
पाकळ्याही गळून पडतात ,

ज्याला मनापासून आपले मानले ,

तेच आपल्याला विसरून जातात.

फुले वाळू लागली कि फुलपाखरे देखील सोडून जातात......  

***********************************************************************************
 सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं..

त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच असतं..

आपल्या मनासारखं कधीचघडत नसतं..

हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं..

ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं..

दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं,
दु:खच नसेल आयुष्यात तर मजा घेता येईल का..??

ओलं न होता कधीतरी पावसात भिजता येईल का..??   
*************************************************************************************
कळतच नाही कधी मनाशी मन जुळत ,
पाहता पाहता प्रेमाच फुल खुलत,

येताच कोणी आयुष्यात,
आयुष्य वेगळ्याच वळणावर वळत,

अन आयुष्यभर साथ देण्यासाठी,

... आपल्याला हि कोणी तरी मिळत...
आपल्याला हि कोणी तरी मिळत...    
**************************************************************************************
 
जमेल का रे तुला कधी माझ्या डोळ्यात बघणे ,माझ्यात हरवून जाने
जमेल का रे तुला कधी भेटायला आल्यावर माझ्या नजरेला नजर देन
जमेल का रे तुला कधी माजा हाथ पकडणे मी तुजाच आहे म्हणून सांगण
जमेल का रे तुला कधी माझ्यासोबत तुजे आयुष्य घालवणं
जमेल का रे तुला कधी माझ्या मनातले ओळखणं
मी काही नाही बोलले तरी नजरेने सर्व काही ओळखण
जमेल का रे तुला कधी माझ्यापाडून दूर होण.
जमला तरी नको जावूस रे
मला सहनच होणार नाही तुजे ते दुरावण ........


*************************************************************************************
सगळेच म्हणतात,
ती असावी अशी..?
फुललेल्या गुलाबाची कळी जशी..

ती बोलावी अशी..?
सुरात कोकिळा गावी जशी..

ती हसावी अशी..?
लहानशी भाउली हसावी जशी..

अन ती दिसावी अशी..?
अप्सरा पृथ्वीवर यावी जशी..

पण...

माझी ती परी मला हवी कशी..?
.
.
.
.
ती मला हवी अशी...

चंद्रा कडे हि नसावी चांदणी जशी..
चंद्रा कडे हि नसावी चांदणी जशी.............
***************************************************************************************

तुझ्या आनंदात माझं जग आहे,
तुझ्या दु:खात माझं जग आहे..

तुझ्या हसण्यात माझं जग आहे,
तुझ्या रुसण्यात माझं जग आहे..

तुझ्या लपण्यात माझं जग आहे,
तुला शोधण्यात माझं जग आहे..

तुझ्या बघण्यात माझं जग आहे,
असं रे काय बघतोस...???.. :)

तुझ्या झुकलेल्या नजरेत माझं जग आहे..
तुझ्या स्पर्शात माझं जग आहे,,
तुझ्या श्वासात माझं जग आहे...

किती जोरात धडधडतंय हृदय तुझं..??.. :)

तुझ्या हृदयात माझं जग आहे..

जग तू मनसोक्त.. :)

तुझ्या मनसोक्त जगण्यातच माझं जग आहे...!!!

***********************************************************************************

डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले..
आजही पुन्हा तेच झाले...

मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ...
येताच आठवण तुझी..

मनाला माझ्या खुप सावरले..
तरिही पुन्हा तेच झाले...

सर्व जुने पुन्हा नवे झाले..
कुणी नाही तु माझा...

मनाला माझ्य खुप समजावले...
तरिही पुन्हा तेच झाले...

मन तुझ्याविना उदास झाले..
जगायचे आयुश्य सुखात...

अनेकांनी सांगुन पाहिले..
तरिहि पुन्हा तेच झाले..

तुझ्याविना हे आयुष्य नकोसे झाले.......

************************************************************************************

छापा असोवा काटा असो.......
नाणे खरे असावे लागते.......

प्रेम असो वा नसो.....
भावना शुद्ध असाव्या लागतात...
...
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी.....
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण
मने मात्र कायमची तुटतात......!   

************************************************************************************

 जेव्हा मला तुजी खरी गरज होती ..

तेव्हा तू सोबत कधीच नव्हतास ..

जेव्हा तुला माजी गरज होती..

मी तुज हात कदीच सोडला नव्हता ..

तू मात्र अपेक्षा ठेऊन प्रेम केलेस ..

मी तशी अपेक्षा ठेऊन कधीच नाही केले ..

म्हणून तू सोबत असताना जितके प्रेम करत होते ..

त्यापेक्षा जास्त प्रेम तू सोबत नसताना करत आहे ..

माजी साथ आज हि तुज्या सोबत आहे ..

कारण मला जाणीव आहे ..
आपल्या माणसाशिवाय जगणे किती अवघड आहे .



**************************************************************************************




No comments:

Post a Comment